बस-कंटेनरचा भीषण अपघात; ७ ठार, १३ जखमी
बस आणि कंटेनर एकमेकांना धडकून झालेल्या भीषण अपघातात सात जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. हा अपघात मध्य प्रदेशच्या भिंड - ग्वालियर महामार्गावर शुक्रवारी सकाळी घडला. मृतांमध्ये पाच पुरुष आणि दोन महिला आहेत. मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या अपघातात १५ जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आलंय. दुर्घटनाग्रस्त बस ग्वालियरहून बरेलीला जात होती.
'मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी भिंड जिल्ह्यातील गोहद महामार्गवर झालेल्या रस्ते दुर्घटनेत जीव गमावणाऱ्या सात जणांच्या अकाली निधनावर शोक व्यक्त केला आहे. कुटुंबांना दु:ख सहन करण्याची शक्ती देण्याची प्रार्थना त्यांनी ईश्वराकडे केली आहे', असं ट्विट मुख्यमंत्री कार्यालयाकडून करण्यात आलंय.