अनिल देशमुख यांचं मध्यरात्री ट्विट…
माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचे मुख्यमंत्रांना पत्र... पत्रात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केले गंभीर आरोप... आरोपांवरुन राज्यातील राजकारणात खळबळ.... परमबीर सिंह यांची सर्वोच्च न्यायालयात धाव.... मात्र सर्वोच्च न्यायालयाचा सुनावणीस नकार ... या सर्व पार्श्वभूमीवर अनिल देशमुख यांनी रात्री ट्विट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना त्वरित चौकशी करण्याची विनंती केली आहे. सोबत उद्धव ठाकरेंना देण्यात आलेल्या पत्राचा फोटोही ट्विटमध्ये जोडला आहे.
“मी माननीय मुख्यमंत्री महोदय यांना परमबीर सिंग यांनी माझ्यावर जे आरोप केलेत त्याबद्दल चौकशी लावून, “दूध का दूध, पानी का पानी” करावे अशी मागणी केली होती. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी याची चौकशी लावली तर, मी त्याचे स्वागत करीन. सत्यमेव जयते,” असं अनिल देशमुख यांनी ट्विट केलं आहे.
हे ही वाचा... सोशल मीडियावर दिशाचा जलवा; काही तासातच 18 लाख लाईकस्
काय म्हटलं आहे पत्रात
“राज्य शासनाने माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना १७ मार्च २०२१ रोजी मुंबई पोलीस आयुक्त पदावरुन हटवल्यानंतर त्यांनी माझ्यावर जे आरोप लावलेत त्या आरोपामध्ये काहीही सत्यता नाही. त्यामुळे मी आपणांस विनंती करतो की, त्यांनी जे आरोप लावले आहेत या संपूर्ण प्रकरणाची त्वरित चौकशी करुन ‘दूधका दूध पानीका पानी’ करावे,” असं अनिल देशमुखांनी उद्धव ठाकरेंना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.