लखीमपूर खेरी हिंसाचारप्रकरणी केंद्रीय मंत्री अजय मिश्रांच्या मुलाविरोधात गुन्हा दाखल
लखीमपूर खेरी हिंसाचारात आतापर्यंत नऊ जणांचा मृत्यू झाला असून या प्रकरणी केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रासह शेतकऱ्यांविरोधातही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
लखीमपूरमध्ये झालेल्या हिंसाचारात लखीमपूरमधील आंदोलनात मिश्रा यांच्या मालकीच्या एका कारसह तीन एसयूव्हीच्या ताफ्याने शेतकऱ्यांना धडक दिली आणि हा संघर्ष झाला. या तीन गाड्यांपैकी एक गाडी आशिष मिश्रा चालवत असल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला आहे.