.... मी पुन्हा येत अहे !!!
मुंबई : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी आज सकाळी एक ट्विट केलं आहे. यामध्ये त्यांनी "आओ कुछ तूफ़ानी करते है, कल शाम .... मी पुन्हा येत अहे !!!" असं म्हटलं आहे. त्यांचं हे ट्विट अनेकांनी रिट्विट केलं असून यावर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट करत त्यांना टोला लगावला आहे.
त्यांच्या या ट्विटवर अनेकांनी "गाणं तेवढं नको" असं म्हंटल आहे. तर काहींनी देवेंद्र फडणवीस यांच्या "मी पुन्हा येईन" या वाक्यावरुन त्यांना टोला लगावलाय. "ते पंत येणार होते मागच्या दोन वर्षांपासून 'मी पुन्हा येईन' त्यांना आधी येऊ द्या", " ताई साहेब आपले साहेब असेच म्हणाले होते, पण तसा काही झालं नाही, पण तुम्ही या,,,सुस्वागतम्... सुस्वागतम्...." अशा कंमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.