top of page
Writer's pictureMahannewsonline

बस-ऑटोच्या भीषण अपघात; १३ जणांचा मृत्यू

आज सकाळी बस आणि ऑटो रिक्षाची धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला. तसेच चार जण गंभीर जखमी झाले. हा अपघात ग्वाल्हेर (मध्य प्रदेश) शहरातील जुनी छावणी परिसरामध्ये झाला. अपघाताची माहिती मिळताच मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मरण पावलेल्यांच्या नातेवाईकांना चार लाख करुये तर जखमींना ५० हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली.

बस आणि रिक्षाची समोरासमोर धडक झाल्याने रिक्षाचा चालक आणि रिक्षामधील नऊ महिलांचा जागीच मृत्यू झाला असून अन्य तीन जणांचा रुग्णालयात नेताना मृत्यू झाल्याची माहितीसमोर येत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रिक्षामध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी होते. रिक्षामध्ये प्रामुख्याने महिला प्रवासी होत्या. एका कार्यक्रमाच्या ठिकाणी या महिला स्वयंपाक बनवण्यासाठी जात होत्या. त्याचवेळी समोरुन आलेल्या मोरीनाकडे निघालेल्या बसने रिक्षाला समोरुन धडक दिली. मरण पावलेल्या माहिलांची ओळख पटवण्याचं काम सध्या पोलीस करत आहे.


या घटनेची माहिती मिळाल्यानंतर मुख्यमंत्री चौहान यांनी ट्विटरवरुन घडलेल्या अपघाताबद्दल खेद व्यक्त केला आहे. “ग्वाल्हेरमध्ये बस आणि रिक्षाची धडक झाल्याने घडलेल्या अपघातामध्ये अनेकांचे प्राण गेल्याची माहिती मिळाली. मी इश्वराकडे प्रार्थना करतो की या मृतांच्या आत्म्याला शांती मिळावी. तसेच या मृतांच्या नातेवाईकांना हा धक्का सहन करण्याची ताकद परमेश्वर देवो,” असं ट्विट चौहान यांनी केलं आहे.


मी आणि मध्य प्रदेशमधील जनता या दु:खद प्रसंगी मृत्यू पावलेल्यांच्या कुटुंबियांसोबत आहे. त्यांनी स्वत:ला एकटं समजू नये. मध्य प्रदेश सरकारच्यावतीने मरण पावलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबाला चार लाखांची तर जखमींना मदतनिधी म्हणून ५० हजार रुपयांची मदत केली जाईल, असंही चौहान यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

bottom of page