top of page

मुलाचं लग्न जमत नसल्याने आईने उचललं टोकाचं पाऊल ...

रत्नागिरी : मुलांच लग्न व्हावं, संसार उभा रहावा यासाठी आईने बरेच प्रयत्न करूनही मुलाचे लग्न जमले नाही. त्यामुळे नैराश्येच्या गर्तेत अडकलेल्या एका वृध्द महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सडेजांभारी ( ता. गुहागर) येथे घडली आहे. भार्गिथी गोविंद आंबेकर असे आत्महत्या केलेल्या वृध्द महिलेचे नाव आहे. गुहागर पोलीस ठाण्यात याबाबतची नोंद करण्यात आली आहे.

भार्गिथी आंबेकर या सोमवारी (१३ जून ) दुपारपासून बेपत्ता होत्या. मंगळवारी सकाळी १० वाजता एका झाडाला साडीचा गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या स्थितीत त्यांचा मृतदेह आढळला. भार्गिथी आंबेकर, त्यांचा मुलगा व मावशी असे तिघेजण एकत्र राहत होते. मुलाचे लग्न जमत नसल्याने त्यांनी हे पाऊल उचलल असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक पवन कांबळे करत आहेत.


bottom of page