मुलाचं लग्न जमत नसल्याने आईने उचललं टोकाचं पाऊल ...
रत्नागिरी : मुलांच लग्न व्हावं, संसार उभा रहावा यासाठी आईने बरेच प्रयत्न करूनही मुलाचे लग्न जमले नाही. त्यामुळे नैराश्येच्या गर्तेत अडकलेल्या एका वृध्द महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सडेजांभारी ( ता. गुहागर) येथे घडली आहे. भार्गिथी गोविंद आंबेकर असे आत्महत्या केलेल्या वृध्द महिलेचे नाव आहे. गुहागर पोलीस ठाण्यात याबाबतची नोंद करण्यात आली आहे.
भार्गिथी आंबेकर या सोमवारी (१३ जून ) दुपारपासून बेपत्ता होत्या. मंगळवारी सकाळी १० वाजता एका झाडाला साडीचा गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या स्थितीत त्यांचा मृतदेह आढळला. भार्गिथी आंबेकर, त्यांचा मुलगा व मावशी असे तिघेजण एकत्र राहत होते. मुलाचे लग्न जमत नसल्याने त्यांनी हे पाऊल उचलल असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक पवन कांबळे करत आहेत.