top of page
Writer's pictureMahannewsonline

खासदारासह तीन आमदार भाजपा सोडण्याच्या तयारीत ...

भाजपाचे नेते मुकुल रॉय यांनी काल ( शुक्रवारी) तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे भाजपाला मोठा झटका बसला असतानाच भाजपाचे बंगालचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी बोलवलेल्या बैठकीला एका खासदारासह तीन आमदार गैरहजर राहिले. त्यामुळे उलटसुलट चर्चा सुरु असून भाजपाला आणखी हादरे बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपात गेलेले नेते ममता बॅनर्जी पुन्हा सत्तेत आल्याने परतीची पावलं टाकताना दिसत आहे. पूर्वाश्रमीचे तृणमूलचे नेते मुकुल रॉय यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत पुन्हा ममतांच्या उपस्थितीत तृणमूलमध्ये प्रवेश केला. हा भाजपाला मोठा मानला जात आहे.

दरम्यान, पश्चिम बंगाल भाजपाचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी पक्षाची बैठक बोलावली होती. या बैठकीला एका खासदारासह तीन आमदारांनी पाठ फिरवली. त्यामुळे हे चौघे भाजपा सोडण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चेला दुजोरा मिळत असल्याचं म्हटलं जात आहे. भाजपाचे खासदार शांतनु ठाकूर आणि विश्वजित दास, अशोक कीर्तनिया आणि सुब्रत ठाकूर हे तीन आमदार शुक्रवारी दिलीष घोष यांनी बोलावलेल्या बैठकीला गैरहजर होते.


bottom of page