मुंबईतील शाळा ४ ऑक्टोबरपासून होणार सुरु
एका बेंचवर एक विद्यार्थी, पालकांची परवानगी गरजेची
मुंबई : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील सर्व शासकीय आणि खासगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालयं बंद ठेवण्यात आले आहेत. आता कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरत असून ग्रामीण भागात 5 वी ते 12 वी आणि शहरी भागात इयत्ता 8 वी ते 12 वी पर्यंतचे वर्ग 4 ऑक्टोबरपासून सुरु करण्याला राज्य शासनाने परवानगी दिली आहे. त्यानुसार बृहन्मुंबई क्षेत्रातील सर्व माध्यमांच्या शाळांमधील इयत्ता 8 वी ते 12 वी पर्यंतचे वर्ग मार्गदर्शक सूचनांचं पालन करुन सुरु करण्यास मान्यता देण्यात आली असल्याची माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
काय आहे नियमावली ?
एका बेंचवर एक विद्यार्थी
शाळा प्रवेशासाठी पालकांची मंजुरी आवश्यक
सर्व विद्यार्थी शाळेत येणार असतील तर एक दिवस आड शाळा
एका दिवशी १५ ते २० विद्यार्थ्यांनाच प्रवेश
सोशल डिस्टन्सिंग पाळणं आवश्यक
मास्क परिधान करणे आवश्यक
सॅनिटायजर वापरणं गरजेचं