top of page
Writer's pictureMahannewsonline

देशातील कोरोनाबळींची संख्या तीन लाख पार

नवी दिल्ली : देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत सलग तिसऱ्या दिवशी घट झाली आहे. काल दिवसभरात 2 लाख 22 हजार 315 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. काल 4 हजार 454 जणांचा मृत्यू झाला असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ३ लाखांवर गेली आहे.

आजपर्यत देशभरातील 3 लाख 03 हजार 720 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कालच्या दिवसात देशात 3 लाख 2 हजार 544 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. तसेच आतापर्यंत देशातील 19 कोटी 60 लाख 51 हजार 962 नागरिकांचे लसीकरण झाले असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.


bottom of page