top of page

कोरोना निर्बधांबाबत अजित पवार म्हणाले; टास्क फोर्सने सूचना.....

कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. यावर मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली. याबाबत टास्क फोर्सचाही सल्ला घेतला जात असून तज्ज्ञांशी चर्चा केली जात आहे. जर रुग्णसंख्येचं प्रमाण वाढू लागलं आणि टास्क फोर्सने सूचना केल्या तर पुन्हा एकदा निर्बंध लागू केले जाऊ शकतात असं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं आहे. पुण्यातील एका कार्यक्रमानंतर अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी होते.

औरंगाबाद येथील राज ठाकरे यांच्या सभेला काही अटी घालून परवानगी दिली असून त्याचं पालन संबधितांनी करावं, जेणेकरून वातावरण चांगलं राहील, कोणीही आपले विचार मांडत असताना, स्वतःची मत मांडत असताना त्यामधून समाजामध्ये तेढ निर्माण होईल, कुठं तरी कोणाच्या भावना भडकावल्या जातील, तसंच वातावरण खराब होईल असं कोणी वक्तव्य करू नये आणि तसं वागूदेखील नये”. असं म्हणत राज ठाकरेंवर निशाणा साधला.


bottom of page