top of page
Writer's pictureMahannewsonline

देवेंद्र फडणवीस यांचं संजय राऊत यांना प्रत्युत्तर; म्हणाले, सिंह कधीही गिधाडांच्या धमकीला ....

संजय राऊत यांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहून भाजप आणि केंद्रीय तपास यंत्रणांवर खळबळजनक आरोप केल्यानंतर आज सकाळी पत्रकार परिषद घेत भाजप नेत्यांना इशाराही दिला. त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांनी गोव्यात पत्रकार परिषद घेत राऊत यांच्या आरोपांवर भाष्य करत प्रत्युत्तर दिलं आहे. फडणवीस यांनी राऊत यांच्या वर पलटवार करत 'ईडी' काय कारवाई करते, हे 'ईडी' सांगेल. ते का कारवाई करताहेत हे देखील 'ईडी' सांगेल. राऊत व्हिक्टि्म कार्ड खेळण्याचा प्रयत्न करत आहेत. सिंह कधीही गिधाडांच्या धमक्यांना घाबरत नाही असं फडणवीसांनी म्हटलं आहे.


देवेंद्र फडणवीस म्हणाले, सिंह कधीही गिधाडांच्या धमकीला घाबरत नाहीत. मी इतकं नक्कीच सांगू शकतो कि, मोदीजींच्या सरकारमध्ये कुणालाही व्हिक्टिमाईज कधीही केलं जात नाही. संजय राऊत हे एक व्हिक्टिम कार्ड खेळत आहेत. संजय राऊत हे एक संपादक आहेत आणि संपादकाला माहिती असतं कि, हेडलाईन कशी घ्यावी आणि दिवसभर आपलं नाव कसं चालेल... त्या प्रकारे ते वक्तव्य करत असतात.

कोणतंही नवीन समीकरण नाही. भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात विरोधी पक्षाच्या भूमिकेत प्रखरतेने काम करेल आणि पूर्ण शक्तीने आम्ही आमच्या बहुमताने महाराष्ट्रात सरकार स्थापन करु असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.



bottom of page