top of page
Writer's pictureMahannewsonline

माझ्या जीवाला धोका... हल्ल्याला पोलिसांचं पाठबळ; भाजपा नेत्यानं केला आरोप

पंजाबमधील पतियाला जिल्ह्यातील राजापुरा येथे आंदोलक शेतकऱ्यांनी आपल्यावर व सहकाऱ्यांवर हल्ला केला. या हल्ल्याला स्थानिक पोलिसांचं पाठबळ असल्याचा आरोप भारतीय जनता पार्टीचे नेते भुपेश अग्रवाल यांनी केला आहे.

“५०० शेतकऱ्यांनी माझ्यावर हल्ला केला. त्यावेळी डीएसपी तिवाना तेथे उपस्थित होते. त्यांनी मला जाणूनबुजून चुकीच्या दिशेने पाठवलं. माझ्यासोबत पोलिसांची तुकडी पाठवण्यात आली नाही. माझ्या जीवाला धोका आहे. मी अनेकदा येथील एसएसपींना (वरिष्ठ पोलीस अधीक्षकांना) फोन केला पण काही उपयोग झाला नाही. आमच्या मागण्यांकडे डीएसपीने फारसे लक्ष दिलं नाही. त्यांनी मुद्दाम हे केलं,” असा आरोप अग्रवाल यांनी केलाय.

डीसीपी तिवाना यांनी हे आरोप फेटाळून लावले. अग्रवाल आणि त्यांच्या सहकऱ्यांच्या सुरक्षेसाठी पोलिसांची तुकडी तैनात करण्यात आल्याचं म्हटलं आहे. “सर्व आरोप खोटे आहेत. १०० पोलीस कर्मचारी आणि स्टेशन ऑफिसर सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले होते. शेतकरी भाजपा नेत्याच्या घराबाहेर आंदोलन करत होते आणि भाजपा नेत्यांचा कार्यक्रम कार्यालयामध्ये सुरु होता. त्यांना आम्ही सुरक्षितपणे बाहेर काढलं आणि त्यांच्या गाड्यांपर्यंत नेलं. त्यानंतर त्यांना आंदोलक शेतकऱ्यांनी घेरलं असेल पण आमच्यासमोर असा कोणताच प्रकार घडला नाही,” असं डीएसपींनी स्पष्ट केलं आहे.


पोलीस अग्रवाल यांच्याभोवती सुरक्षा कडं बनवून त्यांना गर्दीमधून बाहेर काढत असतानाही शेतकऱ्यांनी दगडफेक केली.



bottom of page