top of page
Writer's pictureMahannewsonline

स्वातंत्र्य दिनी मंत्रालयाबाहेर शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

मुंबई : स्वातंत्र्य दिनाच्या अमृतमोहत्सव सोहळ्यादिवशीच मंत्रालय परिसरात एका शेतकऱ्याने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा पार पडल्यानंतर हा प्रकार घडला. मंत्रालयात ध्वजारोहण करून मुख्यमंत्री बाहेर पडल्यानंतर, वाहतूक सुरळीत झाली व सुरक्षा व्यवस्थेत थोडी शिथिलता आल्यानंतर शेतकऱ्याने मंत्रालयाच्या प्रवेशद्वाराजवळ स्वतःच्या अंगावर रॉकेल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला. परिस्थितीचं गांभिर्य पाहून उपस्थित पोलिसांनी वेळीच शेतकऱ्याला रोखलं आणि अनर्थ टळला. एबीपी माझाने याबाबत वृत्त दिलं आहे.

सुनील गुजर असं आत्महदहनचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याचं नाव असून तो जळगाव जिल्ह्यातील असल्याची माहिती समोर आली आहे. मका व सोयाबीन व्यवहारात आडकाठी होत असल्याचं या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे आणि यातूनच या शेतकऱ्याने आज मंत्रालय परिसरात आत्मदहनाचा प्रयत्न केल्याचं सांगितलं जात आहे.


bottom of page