मराठा आरक्षण : राज्य शासनाच्यावतीने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल
मराठा आरक्षणाचा मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापत असताना, आज राज्य शासनाच्यावतीने आज सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली असल्याची माहिती छत्रपती संभाजीराजे यांनी ट्विट करून दिली आहे.
"मराठा आरक्षण बाबत आम्ही शासनाकडे पुनर्विचार याचिका दाखल करण्याची प्रमुख मागणी मान्य करण्यात आली असून, आज सर्वोच्च न्यायालयात राज्य शासनातर्फे ही याचिका दाखल करण्यात आली." असं छत्रपती संभाजीराजे यांनी ट्विटमध्ये म्हंटल आहे. दिली आहे. तसेच, माझ्या मागणीनुसार या याचिकेमध्ये गायकवाड आयोगाच्या अहवालातील उर्वरीत परिशिष्टे देखील भाषांतरीत करण्यात येतील, असे नमूद केले आहे. अशी देखील माहिती संभाजीराजेंनी दिली आहे.