top of page
Writer's pictureMahannewsonline

स्वतंत्र लढण्याच्या दृष्टीने निवडणुकीच्या तयारीला लागा... ; राज ठाकरे यांचे मनसैनिकांना आदेश!

राज्यातील आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची महत्वपूर्ण बैठक आज मनेसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत राज ठाकरे यांनी नेते, पदाधिकरी आणि कार्यकर्त्यांना महापालिका निवडणुकीच्या कामाला लागण्याचे आदेश दिले.

मुंबई महानगरपालिकेची नवी प्रभाग रचना काल जाहीर झाल्यानंतर आता राजकीय वर्तुळातील घडामोडींना वेग आला असून आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. ही बैठक संपल्यानंतर मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी माध्यमांना माहिती दिली. “निवडणुकीचं, सोशल मीडियाचं, निवडणुकीच्या दिवशीचं व्यवस्थापन कसं करायचं? या संदर्भातील समित्या स्थापन करून, तसेच काही लोकाशी बोलून आणि तिथल्या इच्छुक उमेदवारांशी बोलून त्यांचे मुद्दे काढणे. उमेदवारांची यादी ठरवणे. या सगळ्यांबाबतची चर्चा आजच्या बैठकीत झाली असल्याचे देशपांडे यांनी सांगितले. सध्या तरी राज ठाकरे यांनी आम्हाला स्वतंत्रपणे लढण्याच्या दृष्टीने तयारी करण्याचे आदेश दिले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

वॉर्ड रचना बदलली तरी लोकाची नाराजी नाही ना बदलू शकत. मरठी माणसं, हिंदुत्ववादी माणसं शिवेसेनेबरोबर आहेत का? मग शिवसेनेला अनुकुल असे कुठले वॉर्ड? मुळात असं काही नसतं, लोकाची मानसिकता आता शिवसेनेबरोबर नाही. या संपूर्ण करोनाच्या कालावधीत ज्या प्रकारचा त्रास लोकाना झालेला आहे. कितीही प्रभाग रचना बदलल्या तरीही ते आजचं मरण उद्यावर ढकलंत आहेत, पण मरण अटळ आहे हे निश्चित, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

“ सध्या सगळ्या जागांवर उमेदवारांची चाचपणी करण्याचे आदेश राज ठाकरे यांनी दिली आहेत. तसेच, मुंबईचं महत्व कितीही कमी करण्याचा प्रयत्न कोणीही केला, गेल्या दीडशे वर्षात हे कोणाच्या बापाला जमलेलं नाही आणि यापुढेही जमणार नाही. ” असंही यावेळी संदीप देशपांडे यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं.



bottom of page