top of page
Writer's pictureMahannewsonline

नवरा तुरूंगात जाताच बायकोचं दुसरं लग्न.... तुरुंगातून बाहेर येताच केली सासूची हत्या

मुंबई : लग्नाचे बंधन अतिशय पवित्र मानले जाते. पण कधी कधी अशा बातम्या येतात, ज्या ऐकून आश्चर्य वाटते. अशीच एक घटना हॉस्पिटॅलिटी हॉटेलजवळील पितळेवाडी परिसरात २ सप्टेंबर रोजी घडली घडली. रागाच्या भरात सासूची हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी इक्बाल अब्बास शेख याला अटक केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, आरोपी इक्बाल अब्बास शेख आणि लीना यांचे २०११ मध्ये लग्न झाले होते. त्यांना दोन मुले आहेत. अब्बासला एका प्रकरणामुळे २०१८ मध्ये तुरुंगवासाची शिक्षा झाली होती, ज्यामुळे त्याला काही वर्षांसाठी तुरुंगात जावे लागले. पती तुरुंगात गेल्यानंतर पत्नीला मुलांच्या संगोपनाची काळजी वाटू लागली. म्हणून तिने दुसरे लग्न केले.

तुरुंगवास भोगल्यानंतर काही वर्षांनंतर जेव्हा अब्बास बाहेर आला. तेव्हा घरी आल्यावर त्याला आपल्या पत्नीच्या दुसऱ्या लग्नाची माहिती मिळाली, तुरुंगातून बाहेर आल्यानंतर अब्बास आपल्या पत्नीच्या माहेरी गेला आणि तिला घरी परत येण्यास सांगितले. तेव्हा पत्नीने संमती दर्शवली, त्यानंतर अब्बास तेथून निघून आला. पत्नी घरी आली नाही म्हणून दुसऱ्या दिवशी तो पुन्हा पत्नीला आणायला तिच्या माहेरी पोहोचला तेव्हा त्याला त्याची पत्नी दिसली नाही. त्याने आपल्या सासूला बायकोबद्दल वारंवार विचारले असता सासूने त्याला काहीच माहित नसल्याचे सांगितले.

वारंवार काहीही विचारल्यानंतर उत्तर न मिळाल्याने अब्बासला राग अनावर झाला आणि त्याने सासूची हत्या केली. हत्येच्या आरोपावरून पोलिसांनी अब्बासला अटक केली आहे. या प्रकरणाचा पोलिस कसून तपास करत आहेत.


bottom of page