top of page
Writer's pictureMahannewsonline

प्रेमप्रकरणातून तरुणाला जिवंत जाळले...

नाशिक : प्रेम प्रकरणातून एका तरुणाला मारहाण करत जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. ही घटना नाशिक जिल्ह्याच्या लोहणेर गावात घडली. विशेष म्हणजे, मुलीनेच आपल्या कुटुंबियाच्या मदतीनं तरूणावर ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून दिलंय. याप्रकरणी देवळा पोलिसांनी मुलीसह चौघांना ताब्यात घेतले आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली.

मिळालेल्या माहितीनुसार, गोरख काशिनाथ बच्छाव असं पीडित तरुणाचं नाव आहे. पीडिताची तीन वर्षांपूर्वी मालेगाव जवळील रावळगाव येथील तरुणीशी ओळख झाली होती. दरम्यान, त्यांच्या ओळखीचं प्रेमात रुपांतर झाले. त्यानंतर या दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला. परंतु, त्यांच्या लग्नास दोघांच्या नातेवाईकांनी विरोध दर्शवला. यातून वाद सुरु झाला. काही दिवसांपूर्वी संबंधित मुलीचे दुसऱ्यासोबत लग्नही ठरले होते. मात्र काही कारणाने हे लग्न मोडले. त्यामुळे गोरखनेच मुलीच्या सासरच्यांना सांगून लग्न मोडले, असा मुलीला आणि तिच्या घरच्यांना संशय होता.

दरम्यान, गोरख हा शुक्रवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास लोहणेर वासोळ रोडवर उभा असतांनाच मुलीसह मुलीचे वडील, आई आणि दोन भाऊ त्या ठिकाणी पोहचले. त्यांनी गोरखला लोखंडी रॉड आणि काठीनं मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर मुलीनं त्याच्या अंगावर पेट्रोल ओतून त्याला पेटवून दिलंय. या घटनेत गोरख ५५ टक्के भाजला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. त्याच्यावर नाशिकच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी देवळा पोलिसांनी मुलीसह चौघांना ताब्यात घेतले आहे.







bottom of page