top of page
Writer's pictureMahannewsonline

"मोदीजी अजून किती फेकणार, हद्द झाली राव”

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या बांगलादेश दौऱ्यावर आहेत. ढाका येथील एका कार्यक्रमात बोलताना नरेंद्र मोदींनी बांगलादेशला स्वातंत्र्य मिळावं म्हणून मी सुद्धा लढ्यात उतरलेलो, मला अटकही झाली होती असं सांगितलं. मोदींच्या या वक्तव्यावरुन सोशल मीडियावर चर्चा रंगली असताना दुसरीकडे विरोधकही त्यांच्यावर निशाणा साधत आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही मोदींच्या या वक्तव्यावर निशाणा साधत मोदीजी अजून किती फेकणार? असा सवाल केला आहे.



“अजून किती फेकणार मोदीजी, हद्द केली राव. शेतकरी आंदोलनावर तुमच्या तोंडून एक शब्दही निघाला नाही आणि स्वातंत्र्याबद्दल बोलण्यासाठी बांगलादेशला जाता. तुम्ही शेतकऱ्यांना आंदोलनजीवी म्हणाला होतात. आता तुम्ही कोण झालात ढोंगीजीवी”. असं नाना पटोले यांनी ट्विट मध्ये म्हटलं आहे.


काय म्हटलं मोदींनी

“मी बांगलादेशातील बंधू व भगिनींना आणि येथील तरूण पिढीला अभिमानाने आठवण करून देऊ इच्छितो की, बांगलादेशच्या स्वातंत्र्यलढ्यात भाग घेणे, हे माझ्या आयुष्यातील पहिल्या आंदोलनांपैकी एक होतं. माझे वय २०-२२ वर्ष असेल जेव्हा मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी बांगलादेशच्या लोकांच्या स्वातंत्र्यासाठी सत्याग्रह केला होता. तेव्हा मला अटकही झाली होती व तुरूंगात जाण्याचीही वेळ आली होती,” असं नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.


bottom of page