top of page

पुढील ४८ तासांत 'या' जिल्ह्यांत मुसळधार पाऊस; हवामान खात्याचा इशारा

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागांत दमदार पाऊस झाला आहे. कमी दाबाचा पट्टा दक्षिणेकडे सरकला असल्याने राज्यात मुसळधार पाऊस होणार असल्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. पुढील ४८ तासांत पुणे, सातारा, रत्नागिरी आणि रायगड या जिल्ह्यांना ऑरेंज अर्लट जारी करण्यात आला आहे. तर विदर्भातील काही जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे या भागांतील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

दक्षिण कोकण आणि गोवा किनारपट्टीवर तसच घाट परिसरात पुढील ४८ तासांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. मागील काही दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात पावसाची संततधार सुरुच आहे. सध्या हा जोर कमी असला तरी येत्या काही तासांत पाऊस होणार आहे.


bottom of page