top of page
Writer's pictureMahannewsonline

…तर आम्ही ५ वर्षात ५ मुख्यमंत्री, २० उपमुख्यमंत्री देऊ

सुहेलदेव भारतीय समाज पक्षाचे (सुभासपा) राष्ट्रीय अध्यक्ष ओमप्रकाश राजभर हे नेहमी आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत येतात. काल, पुन्हा एकदा त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे ते चर्चेत आलेत. " जर उत्तर प्रदेशमध्ये पक्षाचं सरकार आलं तर वेगवेगळ्या जातीच्या नेत्यांना संधी देण्यासाठी आम्ही ५ वर्षात ५ मुख्यमंत्री, २० उपमुख्यमंत्री देऊ" असं राजभार यांनी म्हटलं आहे. हरदोई येथील कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.

राजभार हे हरदोईमधील अतरौली क्षेत्रामध्ये सुभासपाच्या कार्यकर्त्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीला हजर होते. भाजपावर टीका करताना राजभर यांनी, उत्तर प्रदेशची जनता आता भाजपाला कंटाळली असून भाजपाला कोणी मतं देणार नाही. सुभासपाचे सरकार बननण्यापासून कोणीच थांबवू शकणार नाही, असा विश्वासही राजभार यांनी यावेळी व्यक्त केला.

ओम प्रकाश राजभार यांनी आपल्या भाषणामधून भाजपावर कडाडून टीका केली. त्याचबरोबर त्यांनी निषाद पक्षाचे संजय निषाद यांच्यावरही टीका केली. तुम्ही भाजपाकडे भीक का मागत आहात. त्याऐवजी तुम्ही आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री बनवू, असं राजभार यांनी म्हटलं आहे.


bottom of page