top of page
Writer's pictureMahannewsonline

भाजपाला ओबीसींचा कळवळा कधीपासून यायला लागला ?

मुंबई :जिल्हा परिषद निवडणुका घेण्याचाच सरकारचा डाव असेल तर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पोटनिवडणुकीत भाजप फक्त ओबीसी उमेदवारच देईल, मग विजय किंवा पराजय जे होईल ते आम्ही पाहून घेऊ, असा आक्रमक पवित्रा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी एक सूचक ट्विट करत भाजपवर निशाणा साधला आहे.

"भाजपाला ओबीसींचा कळवळा कधीपासून यायला लागला ? ओबीसी नेत्यांचे नेतृत्व संपविताना हा कळवळा कुठे गेला होता?. .. आता गळा काढण्यात अर्थ नाही. असं रोहिणी खडसे यांनी ट्विटमध्ये म्हटलंय.


bottom of page