top of page
Writer's pictureMahannewsonline

हे पत्र ट्रेलर पण नाही, ट्रेलर अजून यायचा आहे...

संजय राऊत यांनी राज्यसभेचे सभापती आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहून महाराष्ट्रातील आघाडी सरकार पाडण्यासाठी 'ईडी' मार्फत आपल्यावर दबाव आणल्याचा गंभीर आरोप केला आहे. यानंतर राऊत यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेत विविध मुद्यांवर भाष्य केले. आजचं पत्र हा ट्रेलरही नाही, ट्रेलर अजून यायचा आहे. आजचं पत्र फक्त माहितीसाठी लिहिलं आहे.​ पुढची पत्रकार परिषद मुंबईत शिवसेना भवनात घेणार आहोत आणि त्यानंतर थेट 'ईडी'च्या मुंबईतील कार्यालयाबाहेरही हजारो नागरिकांसमोर आपण पत्रकार परिषद घेऊन पोलखोल करणार आहे, असा इशारा संजय राऊत यांनी दिला.

पुढे बोलताना राऊत म्हणाले, “मला देशभरातून सर्व प्रमुख विरोधी पक्षातील नेत्यांचे फोन आले आहेत. महाराष्ट्र, बंगाल, झारखंड आणि छत्तीसगडमध्ये केंद्रीय यंत्रणांचा वापर करुन सरकार पाडायचं, प्रमुख लोकांचा गळा दाबायचा, त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवायचं, त्यांच्याविरोधात खोटे पुरावे निर्माण करायचे हे सुरु आहे. पण आमच्यासारखे लोक या दडपशाहीला जुमानणार नाहीत,” असं संजय राऊत म्हणाले आहेत.

“महाराष्ट्रात सरकार आल्यापासून मी त्यांची वेदना समजू शकतो. त्यांनी राजकीय लढाई लढावी. हे क्रिमिनल सिंडिकेट चालवत आहेत. सध्या ईडी आणि इतर यंत्रणा भाजपा किंवा त्यांच्या मालकांच्या क्रिमिनल सिंडिकेटचा भाग बनले आहेत. आजचं पत्र हा ट्रेलरही नाही, ट्रेलर अजून यायचा आहे. आजचं पत्र फक्त माहितीसाठी लिहिलं आहे. ईडीचे लोक कशाप्रकारे सिंडिकेट चालवतात, यांचे स्व:तचे आर्थिक घोटाळे कसे आहेत, मनी लॉण्ड्रिंग करतात, ब्लॅकमेल करतात, धमकावतात आणि यांचे वसुली एजंट बाहेर आहेत हे पुराव्यानिशी सिद्ध करणार,” असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.


“पवार कुटुंबाकडे पाच दिवस जाऊन ईडीचे लोक बसले होते. नेत्यांची नावं घ्या असं त्यांचं म्हणणं होतं. हेच आमच्या बाबतीच घडत आहे. आम्ही गुडघे टेकू असं वाटतं का? हे भाजपाचे नेते वारंवार मला अनिल देशमुखांच्या बाजूच्या कोठडीत जावं लागेल असं सांगत आहे. तुमची इच्छा असेल तर कोठडीत जाऊ, पण लक्षात ठेवा आमच्या पाठोपाठ त्याच कोठडीत तुम्हालादेखील यावं लागणार आहे. कारण तुमची पापं जास्त आहेत. आम्ही शुद्ध आहोत. ईडीला कायदेशीरपणे ज्या कारवाया करायच्या आहेत त्या कराव्यात. पण मीदेखील ईडीच्या कार्यालयात काय सुरु आहे याचा पर्दाफाश कऱणार आहे,” असंही ते म्हणाले आहेत.

“माझ्या मुलीच्या लग्नातील फुलवाला, डेकोरेशनवाल्या ईडीवाल्यांन उचलून आणलं. हे त्यांचं काम आहे का? किती पैसे मिळाले विचारलं असता डेकोरेशनवाल्याने आपले कुटुंबाशी चांगले संबंध असल्याने पैसे घेतले नसल्याचं सांगितलं. ती मुलगी माझ्यासमोर मोठी झाली आहे, ते माझ्या कुटुंबासारखे आहेत..मी कसे पैसे घेणार असं त्याने सांगितलं. पण त्याला बंदुकीचा धाक दाखवत धमकावण्यात आलं. ही काय दादागिरी आहे. ही मुंबई आहे आणि मुंबईचा दादा शिवसेना आहे,” असं राऊतांनी सांगितलं.

“सूत्रधार कोण आहेत? ईडी कार्यालयात जाऊन बेकायदेशीरणे भाजपाचे लोक बसतात, त्यांना माहिती, आदेश देतात. मी फडवणीसां आवाहन करत आहे. त्यांना माहिती आहे मला काय सांगायचं आहे,” असं सूचक विधान संजय राऊत यांनी केलं.

“उद्धव ठाकरेंच्या कुटुंबीयांनाही खूप त्रास दिला जात आहे. रोज कोणीतरी उठतं आणि बेवड्यासारखा बडबडतो नंतर ईडी त्याच्यावर कारवाई करतं. मी मागेही म्हणालो होतो की, आम्ही तुमच्या घरात घुसलो तर नागपूरलाही जाता येणार नाही,” असा इशारा संजय राऊत यांनी यावेळी दिला. संजय राऊतांनी यावेळी ईडीच्या कार्यालयाबाहेर पत्रकार परिषद घेणार असल्याचं सांगितलं आहे.

पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे

लेटरबॉम्ब टाकत केलेले गंभीर आरोप हा ट्रेलरही नाही, तुम्ही बघाल पुढे पुढे काय काय समोर येतं ते!

​सगळ्यात जास्त ईडीचे खटले महाराष्ट्रातच कसे काय.. बिहार आणि यूपी, दिल्लीत कसे नाहीत?

केंद्राकडून केंद्रीय तपाय यंत्रणाचा वापर केला जात असून ईडीच्या मदतीनं क्रिमिनल सेंडिकेट चालवतात आणि मनी लॉड्रिंग हे पुराव्यानिशी दाखवून देऊ

​दादरा नगर हवेलीत शिवसेना जिंकल्यानंतर यांना जास्त राग आला आणि त्यातूनच कारवाया वाढल्यात

​मी पुढची पत्रकार परिषद सेना भवनात घेणार, त्यानंतर ईडी कार्यालयाबाहेर हजारो लोकांसमोर पत्रकार परिषद घेणार

‘माझ्या मुलीच्या लग्नात ईडीने फुलवाल्याला उचललं आणि गन पॉईन्टवर धमकावत म्हणाले ‘अंदर डाल देंगे!’

​रोज सकाळी कुणीतरी बेवड्यासारखा उठतो, खोटे पुरावे तयार करतो आणि कारवाई करा अशी मागणी करतो जास्त बोलत नाही, ईडीच्या कार्यालयात काय चाललंय. याचे सूत्रधार कोण आहेत, हे लवकरच मी तुम्हाला सांगेन.


bottom of page