बियाणे, खते व किटकनाशकांच्या गुणवत्ता व पुरवठयाबाबत अडचण आल्यास 'या' मोबाईल क्रमांकावर तक्रार करा
कृषि मंत्र्याचे निर्देश; कृषि आयुक्त कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन
राज्यातील शेतकरी, उत्पादक, वाहतुकदार, वितरक व विक्रेते यांना खरीप हंगामात बियाणे, खते, व किटकनाशकांच्या गुणवत्ता व पुरवठा बाबत अडचण येऊ नये यासाठी राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्या सुचनेनुसार कृषि आयुक्त कार्यालयात नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. शेतकरी, उत्पादक, वाहतुकदार, वितरक व विक्रेते यांना क्षेत्रीय स्तरावर काही अडचण आल्यास नियंत्रण कक्षाच्या ई-मेलवर किंवा मोबाईल क्रमांकावर तक्रार करावी, असे आवाहन कृषि संचालक, दिलीप झेंडे यांनी केले आहे.
या मोबाईल क्रमांकावर करु शकता तक्रार
नियंत्रण कक्षाचा controlroom.qe.maharashtra@gmail.com या ईमेल वर किंवा
8446117500, 8446331750 व 8446221750 या भ्रमणध्वनी क्रमांकावर तसेच कृषि विभागाच्या 18002334000 या टोल फ्री क्रमांकावर सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत कार्यालयीन सुट्टीचे दिवस वगळून शेतक-यांना तक्रार दाखल करता येईल.
सबंधितांनी भ्रमनध्वनी , टोल फ्री क्रमांक तसेच ईमेलवर येणा-या अडचणी व निविष्ठांची गुणवत्ता, किमंत, साठेबाजी, व लिकींग बाबत असलेल्या तक्रारी नोंदवितांना शक्यतो आपले नाव, पत्ता, संपर्क क्रमांक व अडचणी किंवा तक्रारीचा संक्षिप्त तपशिल द्यावा किंवा सदर तक्रार को-या कागदावर लिहून त्याचा फोटा व्हॉट्सॲप क्रमांकावर किंवा ईमेलवर पाठविल्यास तक्रारीचे निरसन करणे सोईचे होईल. व्हॉट्सॲपचा वापर करणे शक्य नसेल तर तोंडी तक्रार नोंदवावी. असे कृषि विभागाने कळविले आहे.