top of page
Writer's pictureMahannewsonline

राज्यातील निर्बंध पाच टप्प्यात हटणार ! आदेश जारी

राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत अनलॉक प्रक्रियेची घोषणा केली होती. पण नंतर युटर्न घेत प्रस्ताव विचाराधीन असल्याचं सांगितलं होतं. त्यावरून बराच गोंधळ उडाला. तसेच सरकारमध्येच ताळमेळ नसल्याची टीकाही झाली. आज अखेर राज्यात सोमवारपासून (७ जून) ५ टप्प्यांमध्ये अनलॉक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी याबाबतचा आदेश काढला आहे.

या आदेशानुसार निर्बंधांबाबत पाच टप्पे तयार करण्यात आले आहेत. यात पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात जे जिल्हे येणार आहेत. त्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे. दर आठवड्याला कोरोना स्थितीनुसार हे जिल्हे बदलणार आहेत.

महत्त्वाचं म्हणजे पहिला टप्पा जिथे 5 टक्के पॉझिटिव्हिटी रेट आणि 25 टक्के ऑक्सिजन बेड आहेत, तिथ लॉकडाऊन राहणार नाही. मॉल्स, हॉटेल्स, दुकाने यांना वेळेचे बंधन नाही. इतकंच नाही तर पहिल्या टप्प्यात क्रीडांगण, खासगी आणि शासकीय कार्यालये पूर्ण सुरू होतील, चित्रपटगृह सुरू होतील.


पाच टप्पे नेमके कसे आहेत?

  • पहिला टप्पा : पॉझिटिव्हिटी रेट 5 टक्के, तसेच ऑक्सिजन बेड 25 टक्क्यांपेक्षा कमी व्यापलेले असावेत. पहिल्या टप्प्यात औरंगाबाद, भंडारा, बुलढाणा ,चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया जळगाव, जालना, लातूर, नागरपूर, नांदेड, नाशिक, परभणी,ठाणे ,वर्धा, वाशिम, यवतमाळ या 18 जिल्ह्याचा समावेश आहे.

  • दुसरा टप्पा : पॉझिटिव्हिटी रेट 5 टक्के ऑक्सिजन बेड्स 25 ते 40 टक्क्यांदरम्यान व्यापलेले असावेत. दुसऱ्या टप्प्यात मुंबई, मुंबई उपनगर,अहमदनगर, अमरावती, हिंगोली, नंदुरबार या 6 जिल्ह्याचा समावेश आहे.

  • तिसरा टप्पा : पॉझिटिव्हिटी रेट 5 ते 10 टक्के असावा. ऑक्सिजन बेड्स हे 40 टक्क्यांपेक्षा जास्त व्यापलेले असतील तिसऱ्या टप्प्यात अकोला, बीड, कोल्हापूर, उस्मानाबाद, पालघर, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर या 10 जिल्ह्याचा समावेश आहे.

  • चौथा टप्पा : पॉझिटिव्हिटी रेट 10 ते 20 टक्के असेल. तसेच येथे ऑक्सिजनचे बेड 60 टक्क्यांवर व्यापलेले असतील . चौथ्या टप्प्यात पुणे आणि रायगड या दोन जिल्ह्यांचा समावेश आहे

  • पाचवा टप्पा : पॉझिटिव्हिटी रेट 20 टक्क्यांवर आणि ऑक्सिजन बेड हे 75 टक्क्यांपेक्षा जास्त प्रमाणात व्यापलेले असतील

कोणत्या टप्प्यात काय सुरु?


पहिला टप्पा

  • या भागात सर्व प्रकारची दुकाने पूर्ववत सुरू होणार.

  • मॉल्स, थिएटर्स, मल्टिप्लेक्स, नाट्यगृहेसुद्धा नियमितपणे सुरू होणार.

  • रेस्तराँ सुरू करण्यासाठीही परवानगी.

  • लोकल सेवा पूर्ववत होईल मात्र, स्थितीनुसार स्थानिक आपत्ती व्यवस्थापन विभागास निर्बंध घालण्याची मुभा असेल.

  • सार्वजनिक ठिकाणे, मैदाने खुली राहतील. वॉकिंग आणि सायकलिंगला परवानगी असेल.

  • सर्व खासगी कार्यालये उघडण्याची मुभा. शासकीय कार्यालयेही 100 टक्के कर्मचारी क्षमतेनं सुरू राहतील.

  • विविध खेळ, चित्रीकरण, सामाजिक, सांस्कृतिक, मनोरंजनात्मक कार्यक्रमांनाही मुभा असेल.

  • लग्न सोहळा, अंत्यविधी, बैठका, निवडणूक यावर कोणतेही बंधने नसतील.

  • जीम, सलून, ब्युटी पार्लर, स्पा, वेलनेस सेंटर्सना परवानगी असणार आहे.

  • सार्वजनिक वाहतूक सेवा पूर्ववत असेल करण्यात आली आहे. या भागात जमावबंदीही नसणार आहे.

दुसऱ्या टप्पा

  • 50 टक्के हाॅटेल सुरू

  • माॅल चित्रपटगृह – 50 टक्के

  • सार्वाजिनक जागा, खुली मैदान , मार्निंग वाॅक सायकल सुरू

  • शासकीय आणि खासगी कार्यालये सगळे खुली

  • क्रीडा सायंकाळ सकाळी 5 ते 9

  • संध्याकाळी 5 ते 9 सुरू – इनडोअर आणि आऊटडोर

  • शुटिंग चित्रपट सुरू

  • सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम 50 टक्के खुले

  • लग्न सोहळा मॅरेज हाॅल 50 टक्के आणि जास्तीत 100 लोक उपस्थितीत

  • अंत्यविधी सोहळा सगळे उपस्थितीत राहता येईल

  • मिटींग आणि निवडणूक 50 टक्के उपस्थितीत

  • बांधकाम, कृषी काम खुली

  • इ काॅमर्स सुरू

  • जीम सलुन ब्युटी पार्लर, स्पा 50 टक्के सुरू

  • शासकीय बस आसाम क्षमता 100 टक्के सुरू

  • जिल्हाबाहेर जाण्यासाठी ई पास गरज नसेल, पण जिथ रेड झोन यात जाण्यास किंवा येण्यास ई पास लागेल

तिसऱ्या टप्पा

  • अत्यावश्यक दुकाने आणि इतर दुकाने सकाळी 7 ते 4 खुले राहतील.

  • माॅल्स थिएटर्स सर्व बंद राहतील

  • सोमवार ते शुक्रवार हाॅटेल्स 50 टक्के खुले दुपारी 2 पर्संत खुले राहतील त्यानंतर पार्सल व्यवस्था असेल, शनिवार, रविवार बंद राहतील

  • मॉर्निंक वाॅक, मैदाने , सायकलिंग पहाटे 5 ते सकाळी 9 मुभा

  • 50 टक्के खासगी आणि शासकीय कार्यालय सुरू

  • आऊटडोअर क्रीडा सकाळी 5 ते 9 सुरू सोमवार ते शुक्रवार ,

  • लग्नसोहळा 50 टक्के क्षमतेने तर अंत्यविधी 20 लोक मुभा असतील

  • बांधकाम दुपारी दोन पर्यंत मुभा

  • कृषी सर्व कामे मुभा

  • ई काॅम्रस दुपारी 2 पर्यंत

  • जमावबंदी \ संचारबंदी कायम राहील

चौथ्या टप्पा

  • अत्यावश्यक सेवा 4 वाजेपर्यंत सुरु

  • सरकारी खासगी कार्यालयात 25 टक्के उपस्थिती राहणार

  • क्रीडा 5 ते 9 आऊटडोअर सुरु राहणार

  • सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रम नाही

  • लग्न सभारंभाला 25 लोकांची उपस्थिती ठेवता येणार

  • अंतयात्रेला 20 लोक उपस्थित राहणार

  • बांधकामासाठी फक्त ऑनसाईट कामगार काम करणार

  • शेतीची कामं २ वाजेपर्यंत करता येणार

  • ई कॉमर्स फक्त अत्यावश्यक सेवेसाठी उपलब्ध

  • संचार बंदी लागू असणार

  • सलून, जिम 50 टक्के क्षमता सुरु राहणार,

  • बसेस 50 टक्के विना उभे राहणारे प्रवाशी

5 वा टप्प्यातील जिल्ह्यात कडक निर्बंध असतील



bottom of page